योजना

योजना व अभियाने

अरुळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजना आणि उपक्रम. प्रत्येक उपक्रमाचा उद्देश ग्रामस्थांचे जीवनमान उंचावणे आणि शाश्वत विकास साधणे हा आहे.

नवीन २०२५-२६ समृद्ध पंचायतराज अभियान

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

गावात लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, सुलभ सेवा देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये सक्षमपणे काम करणे.

अधिक माहिती
रोजगार हमी मनरेगा योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

ग्रामीण भागातील कुटुंबांना एका आर्थिक वर्षात किमान १०० दिवसांच्या अकुशल मजुरीची हमी देऊन उपजीविकेची सुरक्षा प्रदान करणे.

अधिक माहिती
गृहनिर्माण आवास योजना

प्रधानमंत्री / रमाई / दिव्यांग आवास योजना

कच्च्या घरात राहणाऱ्या किंवा बेघर असलेल्या गरजू नागरिकांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देणे. सर्वांसाठी हक्काचे घर उपलब्ध करणे.

अधिक माहिती
पाणी पुरवठा जल जीवन मिशन

जल जीवन मिशन (हर घर जल)

गावातील प्रत्येक घरात 'हर घर नळ' द्वारे शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवणे. पाण्याचे स्रोत बळकट करणे.

अधिक माहिती
स्वच्छता स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)

गावांना हागणदारीमुक्त (ODF) करणे, घन व द्रव कचरा व्यवस्थापन करणे आणि वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वच्छतेमध्ये सुधारणा करणे.

अधिक माहिती
विकास निधी १५ वा वित्त आयोग

१५ वा वित्त आयोग

गावातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून मिळणारा निधी. रस्ते, पाणी, आणि इतर अत्यावश्यक सुविधांचे सक्षमीकरण.

अधिक माहिती
पर्यावरण माझी वसुंधरा

माझी वसुंधरा अभियान

पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी पंचमहाभूतांवर (भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश) आधारित उपाययोजना राबवणे.

अधिक माहिती
शेतकरी पीएम किसान

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते.

अधिक माहिती
Scroll to Top